Posts

हुंड्याची देवाणघेवाण थांबवणार आहात का ?

Image
 हुंडामुक्त समाज निर्माण होणार...? - भूषणआप्पा कारंजकर माझ्या मायबाप जनतेला माझा नमस्कार.. जागतिक बँकेच्या अहवालानुसार भारतात ९५ % लग्नात हुंडा घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. ही भारतीय   समाजासाठी अतिशय लाजिरवाणी बाब म्हणावी लागेल.भारत स्वातंत्र्य होऊन आज अनेक वर्षे उलटून गेलीत. समाज दिवसेंदिवस सुशिक्षित होत चाल्लाय असे आपण नेहमीच म्हणतो..परंतु समाज खरंच सुशिक्षित झालाय का ? सुशिक्षित म्हणजे फक्त लिहिता वाचता येणे,इंग्लिश मध्ये बोलणे, शिक्षण घेऊन चांगली नौकरी मिळविणे, उच्च राहणीमान असणे बस्स एवढंच असतं का ?. आपला समाज शिक्षण घेतोय खरा परंतु जोपर्यंत.. मानसिक आणि वैचारिक सुशिक्षितता येत नाही तोपर्यंत समाजाला सुशिक्षित म्हणता येणार नाही. भारतातील ग्रामीण भागातच काय शहरी भागात सुद्धा आजही हुंड्यांवरून लग्न मोडण्याचे प्रकार दिसून येतात. आज मुली प्रत्येक क्षेत्रात आघाडीवर आहेत. मुलाचं जेवढं शिक्षण तेवढंच किंवा त्याहीपेक्षा जास्त मुलींचं आहे. मुली विदेशात सुद्धा शिक्षण घ्यायला गेल्यात, मुलींनी चंद्रावर सुद्धा झेप घेतली पण तरी आजही ह्या भारतीय मानसिकतेत हुंडा घेण्याची प्रथा जिवं...

सत्तेपेक्षा देशातील महागाईकडे लक्ष असू द्या साहेब..!

Image
  मध्यमवर्गाचे अजून किती नुकसान करणार आहात..! - भूषणआप्पा कारंजकर माझ्या मायबाप जनतेला माझा नमस्कार... देशातील सर्वसामान्य जनतेला कोरोना या भयंकर आजारापेक्षा महागाई या अतिभयंकर रोगाची जास्त भीती वाटत आहे.हा महागाईचा रोग जनतेला रोज छळतोय .सर्वसामान्यांचं जीवनमान दिवसेंदिवस विस्कळीत होत चाललंय.देशातील सर्व सामान्य जनता गिरिबीच्या खाईत लोटल्या जात आहे.मात्र याकडे मोदी सरकार पाहिजे तेवढं गांभीर्याने लक्ष देत नाही आहे.या सरकारची पहिली टर्म तर सर्वसामान्य जनतेसाठी फार विशेष अशी तर नव्हतीच परंतु दुसरी टर्म मात्र फार त्रासदायक ठरत आहे.आज कुठल्या गोष्टींची भाववाढ झालेली नाही हे मोदी सरकारने सांगावे. दिवसेंदिवस प्रत्येक गोष्ट सर्वसामान्यांच्या आवाक्याच्या पलीकडे चालली आहे. पेट्रोल,डीझेल तर अक्षरशः सर्वसामान्यांच्या खिशालाच आग लावत आहे. गॅस सिलेंडर सामान्यांना परवडत नसल्यामुळे अनेक घरात आता चुली पेटू लागल्या आहेत.इतकी भयानक परिस्थिती या आधी देशामध्ये क्वचितच आली असावी.  मी मोदी साहेबांना सर्वसामान्यांच्या वतीने विचारू इच्छितो... हेच अच्छे दिन आहेत का ? २०१४ ला तर आपण फार गोड आवाजा...

काँग्रेसला अपयश का आणि कुणामुळे आले ?

Image
देशामध्ये  काँग्रेस   चा पराभव कुणामुळे झाला...? - भूषणआप्पा कारंजकर माझ्या मायबाप जनतेला माझा नमस्कार.. २०१४ पासून देशामध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस चा सातत्याने पराभव होतोय.. हा पराभव कुणामुळे झाला आणि का झाला, कसा झाला याच संशोधन आजतागयत अनेक राजकीय तज्ज्ञांनी आणि नेत्यांनी केले आणि प्रसार माध्यमांनी यावर चर्चा सुद्धा घडवून आणल्यात... असो.कुणी राहुल गांधी याना जबाबदार धरले तर कुणी माजी पंतप्रधान  मनमोहन सिंग तर कुणी नरेंद्र मोदी याना.आपापल्या मताप्रमाणे अनेकांनी अनेक कारणे दिलीत.परंतु फार कमी लोकांना उमजले कि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस या अवाढव्य पक्षाचा पराभव हा स्वतः मुळेच झाला.हो संपूर्ण काँग्रेस स्वतःच स्वतःच्या पराभवाला जबाबदार आहे दुसरं तिसरं कुणीही नाही. गेली अनेक वर्षे काँग्रेसच पक्षाच्या संघटनात्मक बांधणी कडे लक्ष नाही.पक्षाकडे Unity उरली नाही.काही लोक विचारतात.. राहुल गांधी  जबाबदार आहेत का ?. याच उत्तर हो आहेत.परंतु पूर्णतः जबादादर नाहीत. २०१४ किंवा २०१९ ला भारतीय जनता पार्टीने जेव्हढा उत्साह दाखवला तेवढा काँग्रेस ला दाखवता आला नाही. काँग्र...

केंद्र सरकार बहिरेपणाचं सोंग घेत आहे की काय ..!

Image
  शेतकऱ्यांवरती अन्याय करणे २०२४ ला महागात पडेल साहेब..! Farmer protest against the central government of India. - भूषणआप्पा कारंजकर माझ्या मायबाप जनेतला माझा नमस्कार..  कृषी कायद्याविरोधात गेली ७ महिने देशातील शेतकरी जिद्दीने आणि चिकाटीने आंदोलन करत आहेत..केंद्र सरकारने लादलेल्या ३ नवीन कृषी कायद्यांना शेतकरी बांधवांचा  कडाडून विरोध आहे..याबाबत सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा केंद्र सरकारला सुनावले होते..शेतकरी नेत्यांसोबत चर्चा करून सकारत्मक पद्धतीने हा प्रश्न सोडवावा असे केंद्र सरकारने सुद्धा सांगितले.परंतु केंद्र सरकार बहिरेपणाचं सोंग घेत आहे की काय असं  प्रश्न आता जनतेला पडतोय . कारण केंद्र सरकारने शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष केल्याचे दिसते.मोदी साहेबांकडून तर अपेक्षा करणेच चुकिचे.कारण आजपर्यंत कुठल्या प्रश्नांचा सामना करण्यासाठी साहेब बाहेर पडले नाहीत आणि पत्रकार परिषद सुद्धा घेतलेली दिसत नाही...असे देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच घडतंय की एखाद्या देशाचा पंतप्रधान पत्रकार परिषदेला घाबरतो... असो.  सरकार आणि शेतकरी यांच्यात चर्चेच्या काही बैठकाही झाल्या परंतु अजून ...

केवळ चेहरे बदलून काय साध्य होणार साहेब..?

Image
 कार्यपद्धतीमध्ये बदल करा मोदी साहेब.. The new cabinet of Modi government i.e central government - भूषणआप्पा कारंजकर माझ्या मायबाप जनतेला माझा नमस्कार.. मोदी सरकारच्या मंत्री मंडळात कायापालट झाला..काही जुने चेहरे काढून नव्या आयाराम चेहऱ्यानं संधी देण्यात आली.चेहरे बदलून कार्यपद्धती बदलणार का हा प्रश्नच आहे.कारण मोदी सरकारमध्ये मला नाही वाटत मंत्र्यांना स्वतःच्या मतानुसार निर्णय घेता येत असतील.या मंत्रिमंडळ फेरबदलाचा फायदा फक्त एवढाच की जे जुने चेहरे होते ते जनतेला बातम्यांमध्ये का होईना पण ते मंत्री होते हे माहित झाले.मोदी सरकार मध्ये कुठल्या मंत्री पदाचा कारभार कुणाकडे आहे हे जनतेला कळतच नाही.कारण अमित शाह आणि नरेंद्र मोदी यांच्याशिवाय दुसरा कुठला चेहरा निर्णय घेताना दिसतच नाही.मंत्री मंडळात मंत्री आहेत खरे पण त्यांना नर्णय स्वातंत्र्य आहे का ? की हे फक्त One Man मंत्रिमंडळ आहे ? हा सर्वात महत्वाचा प्रश्न आहे. ज्या मंत्र्यांनी राजीनामा दिला त्यांनी आपापल्या खात्यात काय निर्णय घेतलेत, कोणती कामे केलीत हा खर तर  संशोधनाचाच विषय आहे. मोदी सरकारची दुसरी टर्मही आता मध्यावर ये...

अधिवेशनात नेमकं साधलं तरी काय..!

Image
अधिवेशनाचं फलित काय..? फक्त राजकीय कुरघोडीचं..! - भूषणआप्पा कारंजकर माझ्या मायबाप जनतेला माझा नमस्कार.. विधिमंडळाचे २ दिवसीय अधिवेशन पार पडले..त्यात कामकाज कमी आणि राजकीय कुरघोड्याच अधिक झाल्या..मग ते १२ आमदारांचे निलंबन असो किंवा देवेंद्र फडणवीस यांचा अभिरूप विधानसभा भरविण्याचा प्रयोग असो.नुकसान मात्र जनेचेच झाले.अनेक महत्वाचे मुद्दे चर्चिल्याविनाच राहिलेत. OBC च्या मुद्य्यांवर आमचे १२ आमदार निलंबित झाले असे चित्र तयार करून भाजपने राज्यभर रान पेटवायला सुरवात केली आणि आता तर त्या १२ आमदारांसाठी उच्च न्यायालयात सुद्धा जायचे ठरविले.तामिळनाडूच्या धर्तीवर भाजपने हा निर्णय घेतला असावा..असो. विधानसभेत जे काही घडले ते अतिशय लज्जास्पद.. उपाध्यक्षांचा माइक खेचला गेला, शिवीगाळ काय झाली, अध्यक्षांच्या दालनात तर फक्त हाणामारी होण्याची बाकी होती..हे सगळे टाळता आले असते. एक मात्र नक्की भाजपाने उगाचच अति आक्रमक होऊन १२ आमदारांचे निलंबन ओढवून घेतले.  देवेंद्र फडणवीस हे तसे कणखर वक्ते..मोठ्या पातळीवरचे नेते. महाराष्ट्र त्यांच्याकडे एक कर्तृत्ववान विरोधी पक्षनेता म्हणून बघतो. OBC च्या प्रश्नां...

दरवर्षी लाखो युवकांच्या आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या स्वप्नाचा चुराडा...!

Image
आणखी किती बळी घेणार आहात..! - भूषणआप्पा कारंजकर माझ्या मायबाप जनतेला माझा नमस्कार.. प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे महाराष्ट्रातील विध्यार्थ्यांना आता मोठी स्वप्ने बघण्याचा आणि साकार करण्याचा अधिकारच राहिला नाही की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.प्रस्थापित व्यवस्थेने आणखी एका होतकरू विद्यार्थ्यांचा बळी घेतला. पुण्याच्या स्वप्नील लोणकर या २४ वर्षाच्या विद्यार्थ्याने प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे हतबल होऊन स्वतः च जीवनच संपवलं. त्याला राजपत्रित अधिकारी व्हायचं होत,घरची गरिबी दूर करायची होती, शिक्षणासाठी घेतलेले कर्ज फेडायचं होत.. परंतु ह्या सगळ्या गोष्टी राहूनच गेल्यात .मग याला जबादादर कोण तर  फक्त  आणि फक्त प्रशासनचं. त्याने आत्महत्या करण्यापूर्वी चिठ्ठी लिहून ठेवली होती आणि ती प्रकाशात आल्या नंतर मात्र संपूर्ण महाराष्ट्राची झोपच उडाली..परंतु सरकार मात्र अजून जागे झालेले दिसत नाही.  स्वप्नील लोणकर  हा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत २ वर्षापूर्वीच उत्तीर्ण झाला होता. .तेव्हापासून त्याला प्रतीक्षा होती ती मुलाखतीची. स्वप्नील सारखीच अनेक मुले प्रतीक्षेत आहेत...