हुंड्याची देवाणघेवाण थांबवणार आहात का ?

Image
 हुंडामुक्त समाज निर्माण होणार...? - भूषणआप्पा कारंजकर माझ्या मायबाप जनतेला माझा नमस्कार.. जागतिक बँकेच्या अहवालानुसार भारतात ९५ % लग्नात हुंडा घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. ही भारतीय   समाजासाठी अतिशय लाजिरवाणी बाब म्हणावी लागेल.भारत स्वातंत्र्य होऊन आज अनेक वर्षे उलटून गेलीत. समाज दिवसेंदिवस सुशिक्षित होत चाल्लाय असे आपण नेहमीच म्हणतो..परंतु समाज खरंच सुशिक्षित झालाय का ? सुशिक्षित म्हणजे फक्त लिहिता वाचता येणे,इंग्लिश मध्ये बोलणे, शिक्षण घेऊन चांगली नौकरी मिळविणे, उच्च राहणीमान असणे बस्स एवढंच असतं का ?. आपला समाज शिक्षण घेतोय खरा परंतु जोपर्यंत.. मानसिक आणि वैचारिक सुशिक्षितता येत नाही तोपर्यंत समाजाला सुशिक्षित म्हणता येणार नाही. भारतातील ग्रामीण भागातच काय शहरी भागात सुद्धा आजही हुंड्यांवरून लग्न मोडण्याचे प्रकार दिसून येतात. आज मुली प्रत्येक क्षेत्रात आघाडीवर आहेत. मुलाचं जेवढं शिक्षण तेवढंच किंवा त्याहीपेक्षा जास्त मुलींचं आहे. मुली विदेशात सुद्धा शिक्षण घ्यायला गेल्यात, मुलींनी चंद्रावर सुद्धा झेप घेतली पण तरी आजही ह्या भारतीय मानसिकतेत हुंडा घेण्याची प्रथा जिवं...

काँग्रेसला अपयश का आणि कुणामुळे आले ?

देशामध्ये काँग्रेस चा पराभव कुणामुळे झाला...?


Indian national congress. congress vs BJP.


- भूषणआप्पा कारंजकर

माझ्या मायबाप जनतेला माझा नमस्कार..

२०१४ पासून देशामध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस चा सातत्याने पराभव होतोय.. हा पराभव कुणामुळे झाला आणि का झाला, कसा झाला याच संशोधन आजतागयत अनेक राजकीय तज्ज्ञांनी आणि नेत्यांनी केले आणि प्रसार माध्यमांनी यावर चर्चा सुद्धा घडवून आणल्यात... असो.कुणी राहुल गांधी याना जबाबदार धरले तर कुणी माजी पंतप्रधान  मनमोहन सिंग तर कुणी नरेंद्र मोदी याना.आपापल्या मताप्रमाणे अनेकांनी अनेक कारणे दिलीत.परंतु फार कमी लोकांना उमजले कि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस या अवाढव्य पक्षाचा पराभव हा स्वतः मुळेच झाला.हो संपूर्ण काँग्रेस स्वतःच स्वतःच्या पराभवाला जबाबदार आहे दुसरं तिसरं कुणीही नाही.

गेली अनेक वर्षे काँग्रेसच पक्षाच्या संघटनात्मक बांधणी कडे लक्ष नाही.पक्षाकडे Unity उरली नाही.काही लोक विचारतात..राहुल गांधी  जबाबदार आहेत का ?. याच उत्तर हो आहेत.परंतु पूर्णतः जबादादर नाहीत. २०१४ किंवा २०१९ ला भारतीय जनता पार्टीने जेव्हढा उत्साह दाखवला तेवढा काँग्रेस ला दाखवता आला नाही. काँग्रेस मध्ये गटबाजी मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे.याच उदाहरण आपल्याला राजस्थान मध्ये चांगले दिसून येते. एकसंध पक्ष म्हणून पहिले सारखा काम करत नाही आहे.आज  देशामध्ये भारतीय जनता पार्टीवर लोक मोठ्या प्रमाणात नाराज आहेत. परंतु याचा फायदा काँग्रेसला उठवता आलेला नाही.याच कारण गटबाजी.संपूर्ण नेते एकत्र यायला तयार नाहीत.पक्षामध्ये कुणी राहुल गांधी यांच्या पाठीशी आहे तर कुणी विरोधात.ही दुफळी जर अशीच माजत  राहिली तर याचा फायदा 2024  ला  भाजपाला झाल्याशिवाय राहणार नाही हे निश्चित. सर्वात  महत्वाचे म्हणजे काँग्रेस ला एकत्र यावं लागेल.भाजपाची पक्ष बांधणी आज जशी मजबूत आहे त्याप्रमाणेच काँग्रेसला करावी लागेल.या गोष्टींकडे काँग्रेस चे दुर्लक्ष झाले त्यामुळेच आज ही अवस्था झाली.


                                                                          


Comments

Popular posts from this blog

हुंड्याची देवाणघेवाण थांबवणार आहात का ?

अधिवेशनात नेमकं साधलं तरी काय..!

सत्तेपेक्षा देशातील महागाईकडे लक्ष असू द्या साहेब..!